संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

आपुलें कांही न विचारितां धन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६८

आपुलें कांही न विचारितां धन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६८


आपुलें कांही न विचारितां धन ।
निगुणासी ऋण देऊं गेलें ॥१॥
थिवें होतें तें निध सांठविलें ।
विश्वासें घेतलें लक्ष वित्त ॥२॥
ऐसा हा निवृत्तिप्रसादु फ़ळासि आला ।
निर्फ़ळ केला मज निर्गुणाकारें ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु
साच म्हणोनि निघालों ।
तेणें नेऊनि घातलों निरंजनी ॥४॥

अर्थ:-

माझी काय स्थिती होईल याचा कांही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मज जवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्मरूप माझ्या ठिकाणी साठवलें आणि विश्वासाने तत्पद लक्ष्य हेच धन मी घेतले. या रितीने हा श्रीगुरूनिवृत्तिरायांचा प्रसाद फलद्रूप झाला. आणि मी मानीत होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्मरूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हेच खरे आहेच. म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकरता म्हणून निघालो. तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोहोचते केले असे माऊली सांगतात.


आपुलें कांही न विचारितां धन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *