संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

देवाविण शून्य मुख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४११

देवाविण शून्य मुख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४११


देवाविण शून्य मुख ।
नाम न घेतां नाहीं सुख ।
अंतीं होईल रे दु:ख ।
नाम नसतां मुखीं ॥१॥
राम कृष्ण गोविंद ।
हरि माधव परमानंद ।
नित्य ऐसा जयासि छंद ।
तोचि सुलभ गर्भवासीं ॥२॥
अनंत नाम निरसून ।
एक मार्ग तोचि मान्य
तेणें जोडे नित्य सौजन्य ।
तोचि रामकृष्ण उच्चारी ॥३॥
ज्ञानदेवें अनुमानलें ।
मग भक्तिसुख साधलें ।
रामकृष्ण उच्चारिलें ।
जें तारक तिहीं लोकीं ॥४॥

अर्थ:-

हरिनामा शिवाय असलेले मुख म्हणजे शुन्य आहे. नाम मुखात नसेल तर कसले सुख होईल. जर मुखात नाम नसेल तर खात्रीने दुःख प्राप्त होते.राम कृष्ण गोविंद हरि माधव ही नामे परमानंद स्वरुप आहेत त्या नामाचा छंद घेतला तर त्याला गर्भवासाचे दुःख होत नाही. इतर अनंत नामे बाजुला सारुन रामकृष्णनामाचा उच्चार हाच राजमार्ग आहे व त्यामुळे नित्य सौजन्य प्राप्त होते. मी त्या रामकृष्णनामचे अनुमान केले त्याचा उच्चार केला ते तिन्ही लोकांत तारक नाम मी घेतले त्यामुळे भक्तीसुख साधले असे माऊली सांगतात.


देवाविण शून्य मुख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४११

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *