संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जाणीव नेणीव भगवंती नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६१

जाणीव नेणीव भगवंती नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६१


जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।
हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायणहरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीव जंतूंसी केंवि कळे ।
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥

अर्थ:-

हा हुशार हा अनाडी हे भगवंत जाणत नाही.तो फक्त कोण सतत नामजप करते तेच पाहतो.व त्याला मोक्ष देतो.ज्याने नारायण हरि ही नामे जपली त्याला कळीकाळाची फिकिर करण्याचे कारण नाही. जो सतत नाम घेतो तो प्रमाणभूत होतो. ज्या हरिचे वर्णन वेदांना करता आले नाही ते जीवजंतुना कसे समजणार? सतत नारायण नामाचा पाठ केला तर सर्वत्र वैकुंठ निर्माण झाले आहे असे दिसते. असे माऊली सांगतात.


जाणीव नेणीव भगवंती नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *