संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३३

जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३३


जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं
काढावया प्राण ।
मग मूढा पडसी संसार सांकडा ।
कांहीं कटी आपुला उवेडा रया ॥१॥
जाडरे जाडरे सेवटीचा धंदा ।
पडियेलेंसि भवकुंडा ।
एकीकडे जन्म एकीकडे मरण
न निमेचि धंदा कुवाडा रया ॥२॥
थिल्लरीचें जळ मपितरे मिना
जंव न तपे आतपु हा परिमळु ।
जंव हा आयुष्य वोघू
न सरे तंव ठाकी अगाधु ।
पुढें आहे हाल कल्लोळु रया ॥३॥
भाड्याचे घर किती वाढविसी रे गव्हारा ।
दिनु गेलिया काय पंथु आहे ।
ऐसें जाणोनियां वेगी ठाकी लवलाहे ।
बापरखुमादेविवरा
विठ्ठलाचे पाय रया ॥४॥

अर्थ:-

जो पर्यंत शरीरातून प्राण निघून जाऊन शरीर पडले नाही म्हणजे मृत झाले नाही, तो पर्यंतच आपला आत्मलाभाचा प्रयल नाही केला तर संसाराच्या संकटात पडशील.या शरीराच्या धंद्यात म्हणजे भवबंधात पडला आहेस कसा ते पहा.एकीकडे जन्म एकीकडे मरण हा जन्म मरणाचा कठीण धंदा कधीही संपत नाही. डबक्यातल्या पाण्यावर भरवसा ठेवून राहणाया माशांचे जीवित सूर्याने तप्त होऊन पाणी आटवून टाकले नाही तोपर्यंतच असते.म्हणून जोपर्यत आयुष्याचा ओघ आहे तोपर्यंत त्या ओघामध्ये पडून परमात्म समुद्राला जाऊन मिळ.असे केले नाही तर पुढे जन्ममरणाचा फार मोठा हलकल्लोळ आहे.हे शरीर काळाचे असून भाडोत्र्याच्या घराप्रमाणे आपण या शरीरात आहोत. म्हणून त्याच्या करिता किती व्यवहार वाढविणार. दिवस संपल्याल्यावर जसा रस्ता दिसत नाही त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर तुझ्याकडून काही एक होणार नाही. हे सर्व लक्षात घेऊन सर्व व्यवहार बाजूला ठेवून दे. व रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्याचे पाय धर असे माऊली सांगतात.


जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *