संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१६

कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१६


कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे ।
कमळीं कमळ उफ़राटेंगे माय ॥१॥
वासना निरसिलिये ।
ब्रह्मकमळीं उगवलीयेगे बाईये ॥२॥
कारण कामातें करुनि आपैते ।
महाकारण तें गगना परौतें गे बाईये ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु ।
ब्रह्मकमळीं दाविता प्रकाशुगे बाईये ॥४॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ, दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभेआहेत.त्याकडे पाहून अंतःकरणातील वैषयिक वासना नाहीसी होऊन हृदय ब्रह्मकमळी तें श्रीकृष्णाचे चरण उगवले.त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान त्यांत वैषयिक कामना त्याचे संस्कार सहजच असतात. त्याचा निरास केला असता महाकारणदेह म्हणजे परमात्मस्वरुप प्रगट होते. ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे म्हणजे त्या स्वरुपांत सर्व अनात्मपदार्थाचा अभाव असतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरुपज्ञान दाखविणारे आहते असे माऊली सांगतात.


कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *