संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कृष्णें वेधली विरहिणी बोले – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७६

कृष्णें वेधली विरहिणी बोले – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७६


कृष्णें वेधली विरहिणी बोले ।
चंद्रमा करितो उबारागे माये ।
न लवा चंदनु न घाला विंजणवारा ।
हरिविणें शून्य शेजारुगे माये ॥१॥
माझे जिवींचे तुम्हीं कां वो नेणा ।
माझा बळिया तो पंढरीपणा वो माये ॥२॥
नंदनंदनु घडी घडी आणा ।
तयाविण न वचति प्राण वो माये ॥
रखुमादेविवरु विठ्ठ्लु गोविंदु ।
अमृतपानगे माये ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्णानी छंद लावलेली विरहणी म्हणते. हा चंद्रमा अतिशय थंड खरा पण बाई, मला उबारा करतो ग. या उबाऱ्याच्या निवृत्तीची व्यवहारिक साधने म्हणजे अंगाला चंदन लावणे. किंवा वारा घालणे ही आहेत परंतु ती करू नको. कारण माझ्या अंगाचा दाह होण्याचे कारण आज माझ्या बिछान्यावर श्रीकृष्ण नाही हे आहे. ही माझ्या जीवातली गोष्ट तुला कशी कळत नाही ? माझ्या अंगाचा दाह निवारण करणारा बलवान तो पंढरीचा राजाच एक आहे. याकरिता वारंवार तुम्हाला एवढेच सांगते की तो नंदाचा नंदन श्रीकृष्ण त्यालाच घेऊन या. त्याचेवांचून माझे प्राण वाचत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल गोविद त्याची प्राप्ती होणे हे माझ्या शरीराचा दाह निवृत्त करण्याला अमृतपानच आहे. असे माऊली सांगतात.


कृष्णें वेधली विरहिणी बोले – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *