संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२४

मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२४


मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं ।
सुमनाचा परिमळु गुंफ़िता नये ॥१॥
तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों
नये सान थोरु ।
याच्या स्वरुपाचा निर्धारु
कवण जाणें ॥२॥
मोतियाचें पाणी भरुं
नये वो रांजणीं ।
गगनासी गवसणी घालितां नये ॥३॥
कापुराचें कांडण काढितां
नये आड कण ।
साखरेचे गोडपण पाखडतां नये ॥४॥
डोळियांतील बाहुली करुं नये वेगळी ।
धांवोनि अचळीं धरितां नये ॥५॥
विठ्ठलरखुमाईचे भांडणीं
कोण करी बुझावणी ।
तया विठ्ठल चरणीं
शरण ज्ञानदेवो ॥६॥

अर्थ:-

मलयगिरी पर्वतावरिल शितळ वारा जसा गाळुन घेता येत नाही. तसा फुलाचा सुगंध हा गुंफता येत नाही. तसे कोणालाही सर्वेश्वर म्हणु शकत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही. गगनाला गवसणी घालता येत नाही. डोळ्यातील बुबळ वेगळे करता येत नाही. व मैत्रीण जरी असली तरी तिची अंचुली मागता येत नाही. कापराचे कांडण करुन कण काढता येत नाही. साखरेची गोडी पाखडता येत नाही. त्या प्रमाणे विठ्ठल रखुमाईतील भांडण कोण सोडवणार. म्हणुन मी माझे श्री गुरु निवृत्तिनाथांच्या चरणी शरण जातो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *