संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९२

मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९२


मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें ।
तंव परत्र परतेंचि राहिलें ।
हे ना म्हणउनि तया
झोंबिन्नले तंव सिध्दासिध्द हातींचें गेलें ॥१॥
पुढीला चुकला मागिला मुकला
तैसे परी जाली मातें ।
आपआपणातें गोंवीत बुध्दीं दोष
ठेवी कवणातें रया ॥२॥
आतां एक बुध्दि आठवली
गेलें तें परतेना मागुतें ।
बाप रखुमादेवीवराविठ्ठ्लु
ध्याईजे तरी सकळिक
होईल अपैतें ॥३॥

अर्थ:-
मी माझे म्हणत जीव संसारात गुंततो, तर परमात्म वस्तु दूरच राहिली. हे ना म्हणून म्हणजे देह आत्मा म्हणून त्या देहासी तादात्म्य केले तर नित्य, सिद्ध, सुखरुप परमात्मा हातचा गेला. म्हणून पुढच्या परमात्मवस्तुला चुकला व मागिलाला मुकला, म्हणजे देहाचा नाश झाल्यामुळे देहरुपी आत्म्यालाही मुकला, अशी माझी स्थिती झाली आहे. कारण आपल्याच बुद्धीच्या वेडेपणामुळे आपणच आपले गुंतवून घेतले आहेत. त्याचा दोष दुसरे कोणाला द्यावा. आता मनांत असा विचार आला आहे तो असा की, झालेली गोष्ट होऊन गेली, ती आता परत येणार नाही. तेव्हा पुन्हा प्राप्त झालेल्या देहांत माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने त्याचे ध्यान करत राहावे. मग सर्व प्राप्त होईल असे माऊली सांगतात.


मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *