संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मृत्युचेनि मापें जे जे प्राणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४४

मृत्युचेनि मापें जे जे प्राणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४४


मृत्युचेनि मापें जे जे प्राणी ।
तयाची शिराणी यम करी ॥१॥
यम नेम धर्म आम्हां नाहीं कर्म ।
अवघेंचि ब्रह्म होउनि ठेलों ॥२॥
द्वैतभाव ठेला अविनाश संपन्न
आपेंआप जनार्दन येईल घरा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे काज सरलें संसारी ।
चारीही मापारी गिळुनि ठेलों ॥४॥

अर्थ:-

जे जे प्राणी मेलें त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे यम त्यांचा बरावाईट शेवट करतो. त्या कर्मधर्माचे किंवा यमाचे भय आम्हास नाही. कारण आम्ही ब्रह्मरुप होऊन राहिलो. त्या अविनाश ब्रह्मरुपाने जो राहिला त्याचा द्वैतभाव जाऊन परमात्मा जनार्दन त्याचे घराला येईल.अशा स्थितीत आमचे संसाराचे सर्व काम आहे. इतकेच नाही तर संसारिक काम संपविण्याला मदत करणारे जे चारी वेद त्यांनाही आम्ही गिळून बसलो आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


मृत्युचेनि मापें जे जे प्राणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *