संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पदपदार्थ संपन्नता – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८७

पदपदार्थ संपन्नता – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८७


पदपदार्थ संपन्नता ।
व्यर्थ टवाळी कां सांगता ।
हरिनामीं नित्य अनुसरतां ।
हें सार सर्वार्थी ॥१॥
हरिनाम सर्व पंथीं ।
पाहावें नलगे ये अर्थी ।
जें अनुसरलें ते कृतार्थी ।
भवपंथा मुकले ॥
कुळ तरलें तयाचें ।
जींही स्मरण केलें नामाचें ।
भय नाहीं त्या यमाचे ।
सर्व ग्रंथीं बोलियेलें ॥३॥
नलगे धन नलगे मोल ।
न लगति कष्ट बहुसाल ।
कीर्तन करितां काळ वेळ ।
नाहीं नाहीं सर्वथा ॥४॥
हरि सर्व काळ अविकळ ।
स्मरे तो योगिया धन्य केवळ ।
त्याचेनि दर्शनें सर्वकाळ ।
सफ़ळ संसार होतसे ॥५॥
ज्ञानदेवी जप केला ।
मन मुरडुनी हरि ध्याइला ।
तेणें सर्वागीं निवाला ।
हरिच जाला निजांगें ॥६॥

अर्थ:-

वेदांची पद संपन्न आहेत पण व्यर्थ त्यांची टवाळी का सांगायची हरिनामाला नित्य अनुसरले तर त्याचे हे सार सर्वार्थाने आहे. वैदिक धर्माच्या अनेक पंथात हरिनामाचे महत्व सांगतात व त्यामुळे एकच शास्त्रविचार आहे तो म्हणजे हरिनाम व ज्यांनी तो विचार अनुसरला ते कृतार्थ झाले व भवपंथात अडकले नाहीत.ज्यांनी हरिनामाचे स्मरण केले त्यांना यमाचे भय राहिले नाही त्यांची कोटीकुळे तरली असे ग्रंथ उच्चारवाने सांगतात.हरिकीर्तनाला ना धन लागते ना मोल द्यावे लागते व कष्ट ही करावे लागत नाहीत. त्या हरिनामात कोणतेही व्यंग नाही व जे योगी ते घेतात ते धन्य होतात. त्यांचा संसार सुफळ होऊन त्यांना नित्यदर्शन प्राप्त होते.ज्याने मनाला मुरड घालुन हा जप केला तो सर्वांगाने निवाला नव्हे नव्हे हरिरुप झाला असे माऊली सांगतात.


पदपदार्थ संपन्नता – संत ज्ञानेश्वर महाराज अभंगव ३८७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *