संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

रजापासूनियां जाहली उत्पत्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९६९

रजापासूनियां जाहली उत्पत्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९६९


रजापासूनियां जाहली उत्पत्ति ।
सत्त्वगुणीं स्थिति वाढविती ॥१॥
तमोगुणें करूनी पाविजे मरण ।
राहाटती त्रिगुण जगामाजीं ॥२॥
त्रिगुण त्यजुनी व्हावे निस्त्रेगुण ।
नाचरावे पुण्यपाप काहीं ॥३॥
तरीच ब्रह्मज्ञान गुरूकृपाप्राप्ती ।
जिता जिवन्मुक्ती ज्ञानेश्वर ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मदेव रजोगुणाने जगाची उत्पत्ति करतो. विष्णु सत्त्वगुणाच्या योगाने स्थिति वाढवते. शंकर तमोगुणाच्या योगाने नाश करतो अशी त्रिगुणापासून जगाची राहाटी आहे. त्रिगुण टाकून देऊन त्रिगुणाच्या पलीकडे व्हावे. व त्याकरिता पापपुण्यजनक कर्माचे आचरण करू नये. अशी तुमची वागणूक झाली तरच गुरूकृपा होऊन तुम्हाला जीवंतपणीच मुक्तीच्या सुखाचा अनुभव मिळेल. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


रजापासूनियां जाहली उत्पत्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९६९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *