संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सदा परिपूर्ण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१२

सदा परिपूर्ण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१२


सदा परिपूर्ण ।
तो हा जनार्दन ।
नित्य जपता नारायण ।
कोटि याग घडतील ॥१॥
एवढा महिमा नामाचा ।
काय मंत्र जपसील वाचा ।
जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा ।
ऐसा ब्रह्मा बोलें पूर्वीं ॥२॥
तो नित्यकाळ पंढरी ।
आणि देव तेहतीस कोटी ।
वृक्ष जाले निरंतरी ।
उध्दार करावया कुळाचा ॥३॥
एवढें क्षेत्र पांडुरंग ।
तेथें उध्दरिलें हें त्रिजग ।
आनंदत ब्राह्मण याग ।
कोटिकुळें उध्दरती ॥४॥
कीर्तन केलीया वाळवंटी ।
घेतां वैष्णवांची भेटी ।
होईल संसाराची तुटी ।
चरणरज वंदितां ॥५॥
तुळशीच्या माळा ।
घालितां हरिदासाच्या गळां ।
तो न भिये कळिकाळा ।
त्यासी जिव्हाळा हरिविठ्ठल ॥६॥
पंढरीसी जाऊं म्हणती ।
तयांकडे यम न पाहती ।
तयांचे पूर्वज उध्दरती ।
म्हणती वैकुंठा जाऊं आतां ॥७॥
देव जाणे ऐसा ।
तोचि हरिदासा भरंवसा ।
ज्ञानदेव म्हणे परियेसा ।
थोर पुण्य तयाचे ॥८॥

अर्थ:-

तो परिपूर्ण जनार्दन असुन त्या नारायणाला नित्य जपले तर कोटी याग घडतील. तो विठ्ठल दैवाचा असुन त्याचे नामाचा येवढा महिमा असुन तोच मंत्र वाचेने जप.ते ३३ कोटी देव वृक्ष होऊन आपल्या कुळाचा उध्दार करण्यासाठी पंढरीत राहिले आहेत. हे सर्व क्षेत्र पांडुरंग असुन हे त्रिजग त्यामुळे उध्दरते ब्राह्मण आनंदात आहेत व कोटी कुळे तरतात. वाळवंटात कीर्तन केल्याने संतभेट होते व त्यांच्या चरणभेटीने संसाराची तुटी होईल.तुळशीच्या माळा हरिदास गळ्यात घालत्याने ते कळीकाळाला घाबरत नाही.त्याला विठ्ठलाचा जिव्हाळा आहे. जे फक्त पंढरीला जातो म्हणतात.त्यांच्याकडे यम ही पहात नाही व ते थेट वैकुंठाला जातात. हे सर्व करणारा तोच देव आहे हरिदांसाचा भरवसा आहे. व जो त्याचे स्मरण करेल त्याचे थोर पुण आहे असे माऊली सांगतात.


सदा परिपूर्ण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *