संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

साधु बोध झाला तो निरोनिया ठेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७४२

साधु बोध झाला तो निरोनिया ठेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७४२


साधु बोध झाला तो निरोनिया ठेला ।
ठायींच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मोक्ष रेखें आला भाग्यें विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥

अर्थ:-

साधुचा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो. पण तो ठेवा म्हणजे हरिनामच आहे. व तो अंगोपंगात मुरवुन ठेवावा लागतो व तो अनुभव मोठा असतो. कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीत होते तसेच त्या हरिनामाची समाप्ती शरिराबरोबर व्हायला हवी. अशा साधुबोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहचतो व भाग्याचा ठरतो. साधुसंगतीची गोडी घेतली की तो जनात वनात हरिरुपाने आहे हा बोध होतो असे माऊली सांगतात.


साधु बोध झाला तो निरोनिया ठेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७४२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *