संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

समर्थ सोयरा बोळावा केला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९६

समर्थ सोयरा बोळावा केला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९६


समर्थ सोयरा बोळावा केला ।
परि मार्गु गमला सुखाचा बाईये ॥१॥
भय आमुचें गेलें न
व्हावें तें जालें ।
तो चोरुनि वोळखी
जाला बाई ये ॥२॥
लक्षाचा लाभु जोडला ठावो ।
रखुमादेविवरुविठ्ठ्ल नाहो ॥३॥

अर्थ:-
‘समर्थ’जो भगवान श्रीकृष्ण त्याला आम्ही नातेवाईक करून आमच्या मागच्या जन्ममरणाचे भय नाहीसे होऊन गेले. हे लोकदृष्ट्या जरी वाईट दिसले तरी त्यामुळे आमचा प्रपंच सुखाचा झाला आमचे भय तर गेलेच पण न होणारे ते झाले. म्हणजे परमात्मलाभ होणे अत्यंत दुर्लभ पण तो झाला. सर्व प्रापंचिक लोकांची दृष्टि चोरून त्यांचेमध्ये वास करणारा श्रीहरि त्याचीच आज ओळख झाली. तत्पद लक्ष्य जो परमात्मा त्याचा लाभ झाला व तो कोण आहे असे म्हणून विचारले तर रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आमचे नाहो म्हणजे प्रियकर आहेत. असे माऊली सांगतात.


समर्थ सोयरा बोळावा केला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *