संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

शत अश्वमेध घडले जयाला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८९

शत अश्वमेध घडले जयाला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८९


शत अश्वमेध घडले जयाला ।
तरी ब्रह्म त्याला अगम्य हें ॥१॥
सोमयागाची हे नाहीं ज्या गणना ।
तरी आत्मखुणा अलभ्य तें ॥२॥
लक्ष अनुष्ठान त्रिभुवनीं अन्नदान ।
तरी ब्रह्मज्ञान अतर्क् हें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान ।
पावले हे खुण संतसंगे ॥४॥

अर्थ:-

एखाद्याने अश्वमेध यज्ञासारखे शेकडों जरी यज्ञ केले. तरी त्याला ब्रह्म अगम्यच राहील. दुसऱ्या एखांद्याकडून अगणित सोमयाग झाले असले की त्याला आत्मप्राप्ती दुर्लभच असणार. लाखों अनुष्ठाने केली त्रिभुवनाला अन्नदान केले तरी ब्रह्मज्ञान होणे कठीण. यथार्थ ब्रह्मज्ञान होण्याला एक संताची संगतीच घडली पाहिजे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


शत अश्वमेध घडले जयाला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *