संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

षटचक्रें बंद निघूनियां गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०६

षटचक्रें बंद निघूनियां गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०६


षटचक्रें बंद निघूनियां गेली ।
पाहों जो लागलीं तयां गांवा ॥१॥
निरंजन सभराभरीत वस्तू कोंदली ।
साक्षत्वासी आली आत्मदशा ॥२॥
वृत्ति झेंपावली आनंद झाला सैरा ।
सत्रावी येरझारा करी जेथं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे लक्ष लावीं आकाशीं ।
ब्रह्म पावसि लौकरी तूं ॥४॥

अर्थ:-

योगाभ्यासाच्या सिद्धिने आत्मदर्शन झाले असता पूर्वीची ती षट्चक्रे तो मुळबंद वगैरे पाहू गेले तर ते सर्व नाहीसे झालेले असतात.आणि सर्वीकडे शुद्ध आत्मवस्तुच व्याप्त आहे असा अनुभव येतो. अशा रितीने आनंदाची वृत्ति फोफावली असता सत्रावीची येरझार म्हणजे थेंब थेंब अमृत गळण्याची स्थिती सुरुच राहते. तुम्हीही या रितीने योगाभ्यास केला तर तुम्हालाही ब्रह्मस्थिती ताबडतोब प्राप्त होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


षटचक्रें बंद निघूनियां गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८०६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *