संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सुखाचिया गोठी आतां किती हो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१२

सुखाचिया गोठी आतां किती हो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१२


सुखाचिया गोठी आतां किती हो
करणें सुखें सुख अनुभवणें ऐसें करी ॥१॥
पढियंते बाईये गुणेविण हातां नये ।
साचेविण सये तेथें आवडी कैची ॥२॥
कैसेनि कीजे मनासी रक्षण ।
भावासी बंधन केवीं घडे ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि पुरे ।
सुखीं सुख मुरें ऐसें करी वो बाईये ॥४॥

अर्थ:-

आतां नुसत्या सुखाच्या पोकळ गोष्टी किती कराव्या? त्यापेक्षा सुखाने सुखाचाच अनुभव घेता येईल असा प्रयत्न कर. परमात्म्या विषयी खरे प्रेम उत्पन्न झाल्यावाचून तो हाती सापडणार नाही ग बाई आणि खऱ्या अनुभवा शिवाय परमात्म्याविषयी आवड उत्पन्न होणार नाही. मनाला मनाप्रमाणे वागू देऊन भावाचे बंधन घालता येणार नाही. माझे पिता हे सखी रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच पुरेत. त्याच्या चरणावर सुख नुरेल असे कर.असे माऊली सांगतात.


सुखाचिया गोठी आतां किती हो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *