संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

विटंबुनि काया दंड धरी करीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६१

विटंबुनि काया दंड धरी करीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६१


विटंबुनि काया दंड धरी करीं ।
हिंडे घराचारी नवल पाहे ।
असमाधानी विषयीं विव्हळ ।
तरी दंडु केवळ काजा काई ॥१॥
सिध्दचि असतां कां गा विटंबिसी ।
संन्यासी तूं जाण कैसा ॥२॥
निजाश्रमींच वास संकल्पासी त्यागी ।
सर्वस्वें वैरागी ।
तोचि तो संन्यासी ।
संगीं असंगता तोचि जाण संन्यासी ।
स्वरुप तयापाशीं जवळी आहे ॥३॥
बापरखुमादेविवरु उघडचि संन्यासी ।
तोचि पूर्ण भासीं भरला असे ।
निवृत्तिरायें खुणा दाखविला निरुता ।
तो जाणण्या परता सदोदितु ॥४॥

अर्थ:-
संन्यासी होणे म्हणजे देहाला दंडित करुन हातात दंड घेऊन चार घरी भिक्षा मागणे नव्हे. विषय वासनांचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय. त्यासाठी दंड, कमंडलु वगैरे कामाचे नाहीत. तु स्वतः स्वरुप सिध्द असल्याने देहाची विटंबना करुन संन्यास का घेतोस? ज्यांने विहित आश्रमापणे वागले व संकल्पाचा त्याग केला की ते वैराग्यच होते वेगळे संन्यासी होण्याची गरज नाही. ज्याने विषयसंगाशी असंग केला तोच खरा स्वरुपाने संन्यासी झाला हे जाण. संसारात राहुन विषयांपासुन विरक्त झाला तोच खरा संन्यासी आहे हे जाण. माझे पिता व रखुमाईचे पती यांनी तो खरा संन्यास सांगितला व निवृत्तिनाथांनी त्याची खुण दाखवली व त्यामुळे ती अवस्था सदोदित प्राप्त झाली असे माऊली सांगतात.


विटंबुनि काया दंड धरी करीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *