अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १३६

अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १३६


अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी ।
देह उगाणी केली देखा ॥१॥
अंबुला निघाला अंबुल्या गांवा ।
मी वो तया सवा जातु असें ॥
रखुमादेविवरु लागलासे चोरु ।
मार्ग बुडविला घराचारु ॥३॥

अर्थ:-
अष्टसात्त्विक भावाने भोगित असतांना अंतःकरणाची तृप्ति होत नाही. पुन्हा पुन्हा भोगाची इच्छा होतेच म्हणून मी आपला देह त्याच्यावरुन ओवाळून टाकला. माझा पति आपल्या गांवी म्हणजे स्वरुपाच्या ठिकाणी निर्गुण निघाला असता मीही त्याच्याबरोबर चालले आहे. म्हणजे मीही निर्गुण स्वरुप झाले आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हा एक भक्ताचा संसार चोरणारा असून तो माझ्या पाठीशी लागून माझा सर्व संसार त्यानी बुडवून टाकला असे माऊली सांगतात.


अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १३६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.