संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

भेटिसी गेलीये तंव तीच जालिये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २००

भेटिसी गेलीये तंव तीच जालिये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २००


भेटिसी गेलीये तंव तीच जालिये ।
भुलली ठेलिये मज न कळे कांहीं ।
परतलिया दृष्टी जंव मागुता न्याहाळी ।
तंव काळी ना सावळी मूर्ति चोजवेना ॥१॥
काय सांगो माये न कळे तयाची सोये ।
येणें मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥२॥
आंतु बाहेरी कैसी भरलेनि रंगें ।
क्षेम देऊं गेलें अंगे तंव तो जडूनि ठेला ॥
वारितां नावरे काय सांगो माय गोटी
करुनि ठेला साठीं जीवित्वेसी ॥३॥
आशेचिये हावे तंव तो परतीचा धावे ।
निराशेसी पावे वेळु न लागतां ।
बापरखुमादीववरु विठ्ठलीं उपावो ।
ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥४॥
गाईच्या रुपकानें हरीचें वर्णन

अर्थ:-

त्या श्रीकृष्णाच्या भेटीला मी गेले पण आश्चर्य असे की त्याची भेटी झाल्याबरोबर मी तद्रूपच होऊन गेले. काय झाले हे माझे मलाच कळेना पुन्हा माघारी दृष्टि येऊन न्याहाळून पहावयाला लागले तो, ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ति काळी की सांवळी हे समजेना. त्या श्रीकृष्णाची काय स्वरूपस्थिती आहे. ते काही कळत नाही. या श्रीकृष्णाने माझ्या मनाचे संकल्प विकल्पाची धांव मोडून मला वेड लावून टाकला. अंतरबाह्य त्याचे रंगात भरून गेले. आलिंगन द्यावयास गेले. तो माझ्या जीवासी तो ऐक्य होऊन गेला. काय चमत्कार सांगावा त्याला पलीकडे करावयाला गेले तो माझ्या जिवांहून निराळा होतच नाही. मनांमध्ये वैषनयीक आशा ठेवून त्याला पाहू जावे तर तो उलटा दूर जातो. आणि ज्याचे चित्त निराश म्हणजे निर्विषय झाले असेल त्याला एका क्षणाचा वेळ न लागता तो प्राप्त होतो,माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे श्रीगुरू निवृत्तीरायांच्या चरणी निस्सीमभाव असावा हेच होय, असे माऊली सांगतात.


भेटिसी गेलीये तंव तीच जालिये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २००

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *