सार्थ तुकाराम गाथा

एक धरिला चित्तीं – सार्थ तुकाराम गाथा 1497

एक धरिला चित्तीं – सार्थ तुकाराम गाथा 1497

एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥
तेणें जालें अवघें काम । निवारला भवभ्रम ॥ध्रु.॥
परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥
तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ॥३॥

अर्थ

आम्ही आमच्या चित्तामध्ये एक रुक्मिणी चा पती म्हणजे पांडुरंग धारण केला आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाले आहे व आमचा भव भ्रम म्हणजे जगत सत्या हा भ्रम नाहीसा झाला आहे. आम्हाला परद्रव्य आणि परनारी हे विषयाप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला यापेक्षा अधिक व्यवहार करावे लागत नाही.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *