संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४२

अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४२


अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन ।
ज्ञानी ज्ञानघन निरालंबीं ॥१॥
आदि मध्य आंतु दिसोनियां दिसे ।
पाठीं पोटीं दिसे निघोट रया ॥२॥
श्रवणनयन जातिगोतपूर्ण ।
जीवशिवा खुण आसपणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें वाच्य वाचक योगें ।
हरिविण वाउगें नाहीं रया ॥४॥

अर्थ:-

निरालंब म्हणजे ज्याला स्वरुपाशिवाय दुसरा आधार नाही. अशा ज्ञानघन परमात्मरुप अंजनाचे ठिकाणी संपूर्ण मन ठेवून ज्ञानोदय झाला असता, नसून दिसणाऱ्या सर्व त्रैलोक्याच्या आदि मध्ये अंताला व पाठी पोटीही निघोट म्हणजे निष्प्रतिबंध ज्याची व्याप्ति दिसत आहे. ती केवळ परमात्म्याचीच आहे. जातीगोताची अडचण मनांत न आणता, वाच्य वाचकाचे रितीने जीव शीवाचे आत्मरुपाने ‘ऐक्य समजून ‘ श्रवण नयन’ म्हणजे कानानी ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहाणे हे एक परमात्मविषयाला करावे. वाच्य वाचक हे सर्व हरिच आहे. त्याच्यावाचून सर्व मिथ्या आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६४२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *