संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

लेकुरें नसतील काय घरोघरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६२

लेकुरें नसतील काय घरोघरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६२


लेकुरें नसतील काय घरोघरीं
काय न वीये ते माया ।
परि हे दशा वेगळी न बाईहो ।
हा न ये त्या आधीं जीव निघों पाहे ।
आला तरी उरो नेदि कांही ।
जाय तरी जाय । डोळे तळमळिता ठाये ।
लांचावला जिऊ । राहेगे बाईये ॥१॥
तमाळनिळें चांदिणें वो वारि वोवराल आपुलीयेस बये ।
हें मूळदृष्टी पुढें रिघोनिया झाडा घेत आहे ।
येणें कान्हयें कासाविस केलेंगे माये ॥२॥
नेणो कैसे बाळसें ।
डौरलें डोळां लासे ।
माजि महुरजता हे हांसे । भोळिवेचे ।
देखिलियाचि पुरे । घालुनि दॄष्टीचें भुररें ।
मग तें ह्रदयीं वावरे । इच्छावसेंगे माये ॥३॥
थुरथुर करितु । शक्ति भोळी वाचालतुं ।
मुग्दुलें गुणें बोलतुगे माये ॥
असाबतु सावळिया प्रभा
डोळसु नभाचा गाभा ।
कटीं कर ठेऊनियां उभा ।
हेंचि जाणगे माये ॥४॥
पाहों याची नवलपरी । बरवेपणाची हाउली वरी ।
दृष्टी करवी झोंबवी । यासि कवण वारी ॥
आम्हीच साहातों अळी । परी हे चुबडी भली ।
रिघोनिया आड घाली । अगंकांतीगे माये ॥५॥
पहा वो याचा खेळु आमचे नासे ।
कोपो तरी खदखदां हांसे ।
जी जी बाळा म्हणों तरी रुसे वो ॥
राहो नेदी सुखें । न राहे निमिष एके ।
वारा कां गोडी सेविखें । कान्हो दिठीचें माये ॥६॥
आतां येईल म्हणोनि सांपडऊं द्वारें ।
आडऊं तंव झळाळित दिसताहे उजियेडें ।
भितरींच्या भितरी लांबा धुमाळु चाचरु ।
मांडी कामापा़डीं आवारुगे माय ॥७॥
गार्‍हाण्याचें निमिसें । गौळणी उचंबळता हे ब्रह्मरसें ।
वान वसे चोपसें । कृष्णाचेनि ॥
मालाथुन एक मोहरें । देवपण धाडिलें अनुरे ।
भावो किं देवों बैसवाल धुरें । पुसे निवृत्तिदासु ॥८॥

अर्थ:-

घरोघरी काय लेकरे नाहीत? कोणी माता, आपल्या मुलांना काय प्रसवीत नाहीत? परंतु कृष्णाच्या स्वरुपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गौळण म्हणते काय सांगावे बाई हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरांत दूध, दही, लोणी, कांही उरु देत नाही. परमार्थदृष्टीने देहभावही उरु देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्या सारखा होतो ग बाई. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाहाण्याच्या सवयीने घरांतून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ति त्यालाच वरते. हे श्रीकृष्णमूल आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्ववृत्तीच्या झाडा घेत आहे. किंवा घरांत काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू? या कान्हाने जीव अगदी कासावीस करुन टाकला. काय सांगावे ! या श्रीकृष्णाचे रुप ! याच्या डोळ्यांतील तेजाने आमचा डोळा चोरला जातो त्याचे भोळेपणातील हंसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून आपल्या इच्छेने आमच्या मनांत शिरुन व्यवहार करतो. भोळ्याभावाच्या शक्तिने कसा तुरतुर चालतो आहे? कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणांने बोलतो.याच्या नभाच्या गाभासारखा सांवळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे. असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे. याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टि गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहाण्याचा आळ आमचेवर आला तर तो आमचा आम्ही सहन करु. पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते. काय याचा खेळ आमच्या सर्व घरांदाराचा नाश करुन टाकतो. त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हासतो. मृदु भाषेने बाळा, असे करतोस म्हणावे तर रुसतो. सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही. त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते. असे त्याचे दृष्टित कौतुक आहे. आता हा घरांत येईल आपण त्याला घरांतच अडवून धरु असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशांने दिसतो. आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकुळ घालून आम्हालाच आवारांत अडकवल्यासारखे करतो. त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाऱ्हाणी सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत.कृष्णांच्या सौदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात. त्यांनी आपला परमात्मभाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुखभावाच्या स्थांनी बसवाल की नाही असे निवृतीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात.

 


लेकुरें नसतील काय घरोघरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *