संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पैल विळाचियें वेळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७८

पैल विळाचियें वेळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७८


पैल विळाचियें वेळीं ।
आंगणी उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे ।
विठ्ठल केउतागे माये ॥१॥
पायरऊ जाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक ।
नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनी ।
देवकीनंदना लानोनीगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु जिवींचा जिवनु ।
माझे मनिंचे मनोरथ पुरवीं कमळ नयनुगे माये ॥४॥

अर्थ:-

एक विरहिणी म्हणते, पुष्कळ वेळ झाला मी अंगणांत उभी राहिली आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारते. माझा पांडुरंग कोठे आहे तुम्ही कोणी पाहिला आहे काय? पण आश्चर्य हे की मला दृष्ट लागल्याप्रमाणे होऊन त्या श्रीकृष्णाचा छंद लागल्यामुळे तोंडाने सारखी श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल नामाचा घोष करते. त्या छंदात तिला तहान भूक, लोकलज्जा किंवा देहाभिमान याची आठवण नाही कारण देवकीचा नंदन भगवान श्रीकृष्ण त्याकरिताच तिला त्याचा छंद लागून राहिला आहे. तिला अशी खात्री आहे की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, सगळ्या जीवांचे जीवन कमलनयन असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो माझ्या मनांतले मनोरथ परिपूर्ण करीलच करील. असे माऊली सांगतात.


पैल विळाचियें वेळीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *