संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

देऊनियां भेटी मजसी न करी गोठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९७

देऊनियां भेटी मजसी न करी गोठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९७


देऊनियां भेटी मजसी न करी गोठी ।
लांचावला जीउ पाठी न राहेवो ।
निष्ठुर म्हणो तरी अपंगीतो मातें ।
व्यापूनि जीवातें उरी उरवितो ॥१॥
तो दाखवावो माये धरिन त्याचे पाये ।
तयालागीं जीऊ आहे उतावेळु ॥२॥
भेटीचेनि सुखें मनचि होय मुर्के ।
तें रुप देखें परि बोलावेना ॥
सगुण गुणाचा म्हणोनि घातली मिठी ।
तंव तो आपणया समसाठीं करुनि ठेलें ॥३॥
काय नेणों कामाण कैसें वो जालें ।
चित्त चोरुनि नेलें गोवळेनें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठले अंग लपवूनि ।
चैतन्य चोरुनि नेणों माये ॥४॥

अर्थ:-

भगवान परमात्म्याने मला भेट दिली परंतु माझ्याशाची तो बोलत नाही. त्याविषयी माझा जीव इतका लाचांवला की तो जीवस्वरूपाने निराळा उरतच नाही.आता त्याल निष्ठुर म्हणावे तर माझा स्विकार करुन मला अंतरबाह्य व्यापून टाकून जीव असा उरूच देत नाही. असा जो परमात्मा तो मला दाखवा गे बायांनो. त्याचे केंव्हा पाय धरीन अशारितीने माझा जीव त्याच्या दर्शनाकरिता अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या भेटीच्या सुखाची कल्पना मनांत आली म्हणजे मन अगदी मोकळे होऊन जाते. काय सांगू? ते रूप पाहिले तरी त्याचे वर्णन करता येत नाही. श्रीकृष्ण परमात्मा हा उत्तमगुणाचे निधान आहे. म्हणून त्याचे पायी मिठी घातली. तर तो जीवाला आपल्या प्रमाणे परमात्मरूपच करून ठेवतो. कशी मला त्याच्या दर्शनाची इच्छा झाली कोण जाणे? त्या गोधने वळणाऱ्या श्रीकृष्णाने माझे चित्त चोरून नेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी आपले स्वरूप लपवून माझे जीवचैतन्य चोरून नेले.असे माऊली सांगतात.


देऊनियां भेटी मजसी न करी गोठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *