संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१४

तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१४


तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां ।
मग ममतेची चिंता तयासि पुसे ॥१॥
बाई कोणे घरीं सांगे वो जिवित्व ।
परेचें परतत्व कोणे घरीं ॥२॥
सखी सांगे गोष्ठी बाईये रुप वो धरीं ।
आपणचि घरीं सांपडेल ॥३॥
निवृत्तीनें खुणें सांगितलें ज्ञान ।
रखुमादेविवर ध्यान विठ्ठल वरदा ॥४॥

अर्थ:-

एक सखी, आपल्या मैत्रिणीस परमात्मा कोणाच्या घरी आहे ग अशी विचारते. कारण परमतत्त्वांचा विचार केला तर ते तत्त्व हातांस येत नाही. आणि परमतत्त्वांच्या प्राप्तीची चिंता तर सारखी लागून राहिलेली आहे. ते परावाणीहून पलीकडे असणारे परमतत्त्व जें सर्वजीवांचे जीव ते कोणाच्या घरी आहे. सखी तिला उत्तर सांगते. बाई श्रीगुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे विचार केला तर तुमच्या घरांत तें सांपडेल. कारण तुझा जीवच लक्षांशाने परमतत्त्व आहे. ही खूण निवृत्तिरायांनी मला दिल्यामुळे त्या परमतत्त्वाचे ज्ञान होऊन रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ध्यान मला लागले आहे. असे माऊली सांगतात.


तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *