संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

भाग्याचा उदयो किं दैवाचि गति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २२०

भाग्याचा उदयो किं दैवाचि गति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २२०


भाग्याचा उदयो किं दैवाचि गति ।
मज जोडली संगती संताची ॥१॥
माझें मीच भांडवल घेउनिया निगुती ।
लाभाची गति श्री विठ्ठलु ॥२॥
देशदेशाउरा न लगेची जाणें ।
ठाईच जोडणें एक्या भावें ॥३॥
खेपखेपांतर अनेक सोशिलें ।
मुदल उरलें लेखा चारी ॥४॥
मुदल देउनि वाणेरा फ़ेडिला ।
उत्तीर्ण जाला दोही पक्षी ॥५॥
चौघे साक्ष देवउनि अंतरीं ।
वेव्हारा ज्ञानेश्वरी खंडियला ॥६॥

अर्थ:-

आज मला संताची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गति म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्रीविठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्य भावाने जागचे जागीच याचा लाभ झाला.अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे चार वेदाने वर्णन केलेले परमात्मस्वरुप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे मी दोन्ही कुळांत उर्तीर्ण झालो. चारी, वेदाची साक्ष मनांत घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


भाग्याचा उदयो किं दैवाचि गति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २२०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *