संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५४

परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५४


परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी ।
आवडी गिळुनियां आतां जिवे नाहीं तुटी ॥१॥
सांगिजे बोलिजे तैसे नव्हेगे माये ।
सुमर मारिलें येणें श्रीगुरुराये ॥२॥
निवृत्ति दासास निधान दुरी ।
आवडी गिळुनि आतां जिवे नाहीं उरि ॥३॥

अर्थ:-

ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते. व वैखरीही चालत नाही. त्याच्या विषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मस्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी’ म्हणजे स्मरणही त्या श्रीगुरूरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तिरायांसी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्रीगुरूनिवृत्तिरायांचे सन्निधानही दूर गेले. म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीसी झाली. आणि जीवभावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *