संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६४

भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६४


भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक ।
त्याहुनी एथें सुख अधिक दिसे ॥१॥
जंववरि भुली तंववरी बोली ।
समुद्रींचि खोली विरळा जाणे ॥२॥
आशापाश परि निवृत्ति तटाक ।
पडियेले ठक चिद्रूप रुपीं ॥३॥
प्रकाश हरीचा प्रकाशला देहीं ।
नेणतीच कांही मूढजन ॥४॥
ऐलतीरीं ठाके पैलतिरीं ठाके ।
तेथें कैसेनि सामर्थे पाहों आतां ॥५॥
जाणिव शाहाणिव तूंचि निवृत्ति देवा ।
हरि उभय भावा ज्ञान देसी ॥६॥
ज्ञानदेवा शांति उन्मनि रहस्य ।
हरिरुप भाष्य करविलें ॥७॥
बापरखुमादेविवरविठ्ठल ह्रदयीं ।
आलिंगितां बाही भ्रमर जाला ॥८॥

अर्थ:-

जीवरूपी भ्रमराला ब्रह्मानंद मिळाल्यामुळे विषयरूपी द्वंद्वातील सुखाच्या भुकेला तो विसरतो. त्याला या इंद्रियसुखापेक्षा येथेच गोडी वाटते. विषयसुखाच्या भोगाची इच्छा जोपर्यंत प्रपंच सत्यत्व भ्रम आहे तोपर्यंतच असते. त्या विषय सौख्याचे खोल मूळ ब्रह्मानंदच आहे. हे संसारात जाणणारा अत्यंत विरळा. आशापाशांचा शेवट आशेची निवृत्ति होणे हा आहे. आणि त्या आशेची अत्यंत निवृत्ती चैतन्यरूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ति चिकटुन राहीली तरच होते. सर्व देहामध्ये परमात्म्याचाच प्रकाश आहे. हे मंदबद्धीला कळत नाही. प्रपंचाच्या अलीकडच्या व पलीकडच्या म्हणजे प्रवृत्ति निवृत्तिच्या तटाकाला सर्वत्र परमात्माच भरला असल्या मुळे आता तो अमुकच ठिकाणी आहे. असे कसे पाहावे. कारण सर्वत्र तोच आहे. हे निवृत्तिराय परोक्ष अपरोक्ष दोन्हीभावामध्ये हरीच व्याप्त आहे. हे ज्ञान तुम्हीच मला देऊन उन्मनी किंवा शांति याचे रहस्य जो परमात्मा तोच सर्वत्र असल्याचे माझ्याकडून वदविले. माझ्या हृदयामध्ये असलेल्या श्रीविठ्ठलाच्या स्वरूपावर रममाण होणारा मी तुमच्या व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने भ्रमर झालो.


भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *