संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

चौदा भुवनीं चौघां भुलविलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६९

चौदा भुवनीं चौघां भुलविलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६९


चौदा भुवनीं चौघां भुलविलें ।
वेव्हार नासिले स्मृति व्यालीगे माये ॥१॥
अवघे धन देऊनी मज निधन केलें ।
ऋण मागावया धाडिलें नये ते ठायीं ॥२॥
ऐसें श्रीनिवृत्ति शब्दें ।
अगाध जालें ।
माझें मीपण गेलें धन देखा ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु साक्षी ।
तो मज पारखी घेऊनी गेला ॥४॥

अर्थ:-

चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्यानी भुलवून टाकले. म्हणजे परमात्मस्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेंव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृति झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्मरूप करून देहात्मभावनहे जे माझे पूर्वीचे धन होते. ते सगळे निधन केले म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असतां पुन्हा देहभावावर येणे होत नाही. तर तद्रुपस्थिति होते. अशी श्रीगुरू निवृत्तिरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्मरूप झाले. आणि अनात्मपदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते. ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत. त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात.


चौदा भुवनीं चौघां भुलविलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *