संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९२

जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९२


जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री ।
तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥
धन्य कुळ तयाचें रामनाम हेंची वाचे ।
दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणतांची ॥२॥
कोटीकुळाचें उध्दरण मुखीं राम नारायण ।
रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥
नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी ।
तप केलें असेल कोडी तरिच नाम येईल ॥४॥
ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा ।
कुळ गेलें वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥

अर्थ:-

जन्मजन्मातंरीची पुण्याई असेल तरच श्रीरामाचे नांम जिव्हाग्री येते. श्रीराम असे म्हणताच त्याचे जन्माचे दोषांचे हरण होते. रामनाम वाचेने घेतले की त्याचे कुळ धन्य होते. मुखात राम नारायण ही नामे घेतली तर कोटी कुळे उध्दरतात व रामकृष्ण नामाच्या स्मरणाने त्याचा जन्म धन्य होतो. त्या नामाची सांगड बांधली, अर्धक्षण ही नामाशिवाय न राहता तप केले तरच नाम मुखात येते. हरिस्मरण करता करता पुर्वज वैकुंठाला गेले. माझा मोठा अभ्यास नामस्मरण करताना होतो असे माऊली सांगतात.


जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३९२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *