संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

नाममाळा घे पवित्र – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०६

नाममाळा घे पवित्र – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०६


नाममाळा घे पवित्र ।
अंतीं हेंचि शस्त्र ।
राम हा महामंत्र ।
सर्व बाधा निवारी ॥१॥
भवकर्मविख ।
रामनामी होय चोख ।
भवव्यथादु:ख ।
पुढें सुख उपजेल ॥२॥
माळा घाली हेचि गळां घे
अमृताचा गळाळा ।
होईल वैकुंठीं सोहळा रामकृष्ण
उच्चारणी ॥३॥
ज्ञानदेवीं माळा केली ।
सुखाची समाधि साधिली ।
जिव्हा उच्चारणी केली ।
अखंड हरिनाम ॥४॥

अर्थ:-

नाम जपण्याची माला पवित्र असुन रामनाम हा महामंत्र आहे अंतकाळी हेच तुमचे शस्त्र आहे. सर्व बाधांचे निराकरण हे करते.भव कर्मांचे विष नाममंत्राने चोख( कर्म शुध्द होतात )बनते हेच नाम भव दुःख व व्यथा हरण करुन सुख देते. गळ्यात नाम मंत्र मंडित माळा व मुखात सतत रामकृष्णनामाची गुळणी घेत राहिले तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल. मी रामनामाची माळ केली ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो त्यामुळे सुखाची संजिवन समाधी देवाला द्यावी लागली असे माऊली सांगतात.


नाममाळा घे पवित्र – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *