संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

नाम प्रल्हाद उच्चारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२२

नाम प्रल्हाद उच्चारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२२


नाम प्रल्हाद उच्चारी ।
तया सोडवी नरहरी ।
उचलुनि घेतला कडियेवरी ।
भक्तसुखें निवाला ॥१॥
नाम बरवया बरवंट
नाम पवित्र चोखट ।
नाम स्मरे नीळकंठ
निजसुखें निवाला ॥२॥
जें ध्रुवासी आठवले ।
तेचि उपमन्यें घोकिलें ।
तेंचि गजेंद्रा लाधलें ।
हित जालें तयांचे ॥३॥
नाम स्मरे अजामेळ ।
महापातकी चांडाळ ।
नामें जाला सोज्वळ ।
आपण्यासहित निवाला ॥४॥
वाटपाडा कोळिकु ।
नाम स्मरे वाल्मिकु ।
नामें उध्दरिलें तिन्ही लोकु ।
आपणासहित निवाला ॥५॥
ऐसें अनंत अपार ।
नामें तरले चराचर ।
नाम पवित्र आणि परिकर ।
रखुमादेविवराचें ॥६॥

अर्थ:-

नाम प्रल्हादाने घेतले त्यामुळे त्याला नरहरिने सोडवले उचलुन कडेवर घेतला व तो भक्तीसुखाने निवाला. हे नाम उत्तमातील उत्तम असुन ते पवित्र व चोख आहे स्वतः शिवशंभुने त्याचा अंगिकार केल्याने त्यांना निजसुख प्राप्त झाले.त्याचा नामाचा आठव ध्रुवाने केला तेच नाम उपमन्युने घेतले त्याचा लाभ गजेंद्राने घेतला त्यामुळे त्यांचे हित झाले. तेच नाम त्या महापातकी चांडाळ अजामेळ्याने घेतले व त्याला सोज्वळता मिळाली व त्याला ही निजसुखात निववले. वाटमारी करणारा वाल्मिकाने नाम घेतले तो तिन्ही लोकामधुन उध्दारला गेला व त्यालाही निजसुखात निववले. ते रखुमाईचा पती असलेल्याचे नाम अत्यंत पवित्र व परिकर असुन त्यामुळे कित्येकांचा उध्दार झाला हे चराचर त्या नामानेच तरले आहे असे माऊली सांगतात.


नाम प्रल्हाद उच्चारी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *