संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

शरीर वरिवरि कां दंडिसि जंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५८

शरीर वरिवरि कां दंडिसि जंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५८


शरीर वरिवरि कां दंडिसि जंव
वारिलें न करी तुझें मन ।
जळीं नेत्र लाउनि टोकती अविंशा
लागोनि तैसें नको नको बकध्यान करुं ॥१॥
चित्त सुचित्त करी मन
सुचित्त करी ।
न धरी तूं विषयाची सोय ।
वनीं असोनी वनिता चिंतिसि तरि
तपचि वाउगें जाय रया ॥२॥
त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळीं
परि नवजाती मनींचे मळ ।
तुझियानि दोषें तीर्थ कुश्चित्त
जाले जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥
आतां करिसी तरी चोखटची करी त्यासी
साक्ष तुझें तुज मन ।
लटिकेंन झकवसी तर्‍ही देव दूर्‍हा होसी
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥

अर्थ:-
मनातील इच्छा संपल्या नाहीत मग वरवर देहाला दंडण देऊन काय उपयोग.माश्याच्या मिशाने जसे बगळा पाण्यात ध्यानस्थ उभा दिसतो तसे तु ध्यान लावु नकोस. विषयांची सोय न पाहता स्वतःचे चित्त व मन शुध्द कर.वनात राहुन वनितेचा विचार केल्यास तुझे तसे केलेले तप वाया जाईल. तिनवेळा स्नान व अनेक तीर्थस्नाने करुन तुझ्या मनाचा मळ गेला नाही.उलट तुझ्या स्नानाने तीर्थ ही अपवित्र होतील जसा त्या तीर्थात असलेला धोब्याचा दगड अपवित्र असतो. आता जे करशील ते चांगले कर व तुझ्या मनाला त्याचा साक्षीदार कर. जर लबाडी करशिल तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ आहे ते अशाने प्राप्त होणार नाहीत असे माऊली सांगतात.


शरीर वरिवरि कां दंडिसि जंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *