संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६५

येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६५


येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे ।
वर्णाश्रमधर्म त्यागून कोठें जासी ।
म्हणोनि येकचि विदारी बापा ।
जेणें सार्थक होय संसारासी ।
विकल्प नको धरुं ।
अंतर धरुनि राहे या सगुणासी रया ॥१॥
आवडी धरुनी गोडी घेई का ध्यानीं ।
परतोन मग योनि नाहीं तूज ॥२॥
सांडी सांडी त्याग नास्तिकाचे
मस्त नलगे करणें अटणें ।
नानाविधि वाउगे जड
कां सिणवणें ।
केंविं मन होय शुध्दी ।
एकलेंचि मन करुनि स्वाधीन ।
सगुणींचि काय सिध्दि नलभे रया ॥३॥
म्हणोनि येकाकारवृत्ति सगुणीं बैसली ।
प्रीतिचि निर्गुणीचि आर्ति जाण संपदा ।
याची सांडि मांडी न करी ।
निरुतें चित्तीं धरी ।
स्वस्वरुपीं असे सदा
बापरखुमदेविवरुविठ्ठलु चिंतितां सुख
सगुणींची जोडे आनंदु रया ॥४॥

अर्थ:-
तु संन्यासाच्या भानगडीत न पडता वर्णाश्रमामुळे जी नित्यनैमितिक कर्मे आहेत ती करत राहिलास तर संसारातील सार्थकता मिळेल. वर्णाश्रम कर्मे टाकुन तु कोठे जाशिल. असा विकल्प मनात न आणता शुध्द अंतकरणाने त्या सगुणरुपाशी रत हो. हीच मनात आवडी धरुन तसे केलेस तर पुन्हा जन्मयोनीला येणार नाहीस.नुसता बाह्य त्याग यात संसाराची कतार्थता आहे हे नास्तिकाचे मत आहे. ते टाकुन दे. हरिप्राप्ती साठी कोठे ही न जाता, नानाविधीत शिणुन न जाता. त्या सगुणाशी प्रेम ठेवलेस तर सिध्दी काय मिळणार नाहीत का? सगुणाच्या ठिकाणी एकाकार वृत्ती ठेवल्याने निर्गुणाचीच संपदा प्राप्त होते. ह्या साठी कोणती ही सांडमांड न करता, वेगळे काही न करता शुध्द चित्ताने स्वस्वरुपाशी प्रेम धरुन रहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सगुणातच सुख मिळुन आनंद उपभोगता येईल असे माऊली सांगतात.


येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *