संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

अरे मना तूं पापिष्टा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६८

अरे मना तूं पापिष्टा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६८


अरे मना तूं पापिष्टा ।
किती हिंडसी रे तूं नष्टा ॥
सैरा सिणसी रे फ़ुकटा ।
विठ्ठलविनटा स्थिर होई ॥१॥
येणें पैलपार पावसील ॥२॥
तूं अनिवार नावरसी ।
तुझेनि संगें नाडले ऋषी ।
तूं तंव अपभ्रंशीं पाडिशी ।
म्हणोनि गेले गुरुसी शरण ॥३॥
न सोडी हरिचरण ।
नाहीं नाहीं जन्ममरण ।
अविट सेवी नारायण ।
तेणें मी तूं पण एक सिध्द ॥४॥
ज्ञानदेव शरण हरी ।
मन हिंडे चराचरी ।
न सोडी चरण अभ्यंतरी ।
नित्य श्रीहरी ह्रदयीं वसो ॥५॥

अर्थ:-
हे पापी मना नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिणतोस त्यापेक्षा विठ्ठल चरणी स्थिर हो त्यामुळे तू पैलतीराला पोचशील. हे न आवरणाऱ्या मना तुझ्या संगाने ऋषी नाडले तू त्यांना भ्रमीत केलेस म्हणून ते गुरुला शरण गेले. या हरीचरणामुळे तुला जन्ममरण नाही.या नारायण नामाच्या अवीट सेवेने मीतू पणा सोडून एकरुप होशील.मी हरिला शरण जाऊन त्याची नित्य ह्रदयात स्थापना केली. व श्रीगुरू चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात.


अरे मना तूं पापिष्टा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *