संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८१

कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८१


कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे ।
न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥
भोंवया पाहातां न दिसें जाणा ।
आयुष्याची गणना सात दिवस ॥२॥
डोळां घालोनियां बोट चक्र जें पाहावें ।
न दिसतां जाणावें पांच दिवस ॥३॥
नासाग्राचें अग्र न दिसे नयनीं ।
तरी तेंची दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥
ज्ञानदेव म्हणे हें साधूचें लक्षण ।
अंतकाळी आपण पहा वेगीं ॥५॥

अर्थ:-
कानात बोटे घालून नाद ऐकू आला नाही की, आपल्या आयुष्य नऊ दिवस उरले आहे असे समजावे.भुवयांकडे नजर टाकून त्या दिसल्या नाहीत म्हणजे आपले आयुष्य सात दिवस उरले आहे असे समजावे.डोळ्यात बोटे घालून चक्र न दिसल्यास आपले आयुष्य पाच दिवस उरले आहे असे समजावे. नाकाचा शेंडा न दिसल्यास त्याच दिवसी मृत्यु आहे असे समजुन रामकृष्ण नामाचा जप करावा.ही साधूनी सांगून ठेवलेली लक्षणे आहेत याचा अनुभव अतंकाळी ज्याचा त्यांना घ्यावा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *