संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सुढाळ ढाळाचें मोतीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०३

सुढाळ ढाळाचें मोतीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०३


सुढाळ ढाळाचें मोतीं ।
अष्टै अंगे लवे ज्योती ।
जया होय प्राप्ति ।
तोचि लाभे ॥१॥
हातींचें निधान जाय ।
मग तूं करिसी काय ।
पोळलियावरी हाय ।
निवऊं पाहे ॥२॥
अमृतें भोजन घडे ।
कांजियानें चूळ जोडे ।
मग तये चरफ़डे ।
निती नाहीं ॥३॥
अंगा आला नाहीं घावो ।
तंव ठाकी येंक ठावो ।
बापरखुमादेविवरा-विठ्ठलु नाहीं ॥४॥

अर्थ:-

पाणिदार सुढळ मोती जसे असावे त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवास प्राप्त झालेले आहे. मनुष्य शरीरच भगवत् प्राप्तीचे साधन आहे. ते जर केले नाही तर हा मनुष्य शरीररुपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार? पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग.दुसरे असे की वेळ अमृताचे भोजन मिळण्याचा योग आला व गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा जर प्रसंग आला तर नुसते मनातल्या मनांत चरफडत बसावे लागेल याशिवाय दुसरा उपाय काय आहे. याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पति व माझे पिता श्रीविठ्ठल त्याची प्राप्ती करुन घे असे माऊली सांगतात.


सुढाळ ढाळाचें मोतीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *