संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जव या वायूचा प्रकाश तंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३४

जव या वायूचा प्रकाश तंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३४


जव या वायूचा प्रकाश तंव
या भंडियाचा विश्वासु ।
वायो निघोनियां गेला
ठाईहुनि जाला उदासु रया ॥१॥
काळाचें भतुकें श्रृंगारिलें कौतुकें ।
जातसे तें देखे परी न चले कांहीं ॥२॥
ठाईचेचि जाणार कीं नव्हे राहणार यासी
जतन ते काई ।
जेथील तेथें निमोनियां गेलें उपचार
नचलेचि कांहीं ॥३॥
हें काळाचें भांडें कीं अवघेंचि लटिकें
जैसें आहे तैसें सांगेन पुढती ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि
सकळ जीवांचा सांगाती रया ॥४॥

अर्थ:-

जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायुचा प्रकाश म्हणजे संचार आहे. तोपर्यंत शरीररुप भांड्याचा विश्वास आहे. एकदा काय शरीरातून प्राण निघून घेला की जागच्या जागी विद्रूप होऊन जाते.शरीर काळाचे खाद्य आहे. त्याला कोडकौतुक करुन श्रुंगारले तरी मृत्यू घेवून जात असता ते त्याच्या तावडीतून सुटण्याला काही एक उपाय चालत नाही. मूळातच हे शरीर जाणारे आहे ते राहणार नाही. त्याचे रक्षण तरी काय करणार. नष्ट होते वेळी त्याला टिकविण्याकरिता कितीतरी प्रयत्न केले तरी त्याचा कांही एक उपयोग होणार नाही.शरीर काळाचे भांडे तसेच हे मिथ्या आहे. याच्या विषयी जो खरा विचार आहे तो विचार एवढाच की, रखुमादेवीवर बाप जो श्री विठ्ठल तोच एक व्यापक असून जीवाला सर्व दुःखातून सोडविणारा तोच खरा सोबती आहे असे माऊली सांगतात.


जव या वायूचा प्रकाश तंव – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *