संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९

एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९


एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे ॥१॥
एकीनें सांगितलें दुजीनें परिसलें । प्रपंचा पुसलें तेणें रुपें ॥२॥
तें घरटीं कडी सोकरी बागडी । सोहं कथा उघडी पंढरीये ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस मनें । नयनांसी पारणें देखतांची ॥४॥

अर्थ:-
एक सखी,आपल्या मैत्रीणीला म्हणते हे सखे, श्रीहरि विषयीचा भाव मला मौन धारण करू देत नाही. दुसरी सखी म्हणते मला त्या परमात्म्याचे ज्ञान सांग, त्या परमात्म्याचा उपदेश एेकीन सांगितला. व दुसरीने एेकला. त्या उपदेशाचा प्रकार असा आहे की, उपदेश ऐकल्याबरोबर परमात्मभाव प्रगट होऊन संसार आपोआपच नाहीसा होऊन जातो. अशीहि परमात्मस्वरूपाची टेकडी ती बागडी म्हणजे सहज सोकरी म्हणजे स्वाधीन करून घेतली असता, सोहं भाव प्रगट होतो. हा परमात्मभाव अगदी उघड आहे. हा प्रगट होण्याचे ठिकाण एक पंढरपूरच आहे.३ त्या पंढरीस राहणारा श्रीविठ्ठल त्याला पाहताक्षणीच डोळ्याचे व मनाचे पारणे फिटून परमानंद प्राप्त झाला हे सर्व श्रीगुरू निवृत्तीरायांचे कृपेचे फळ आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *