संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

आधींच तू ज्ञान वरी जालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६०७

आधींच तू ज्ञान वरी जालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६०७


आधींच तू ज्ञान वरी जालें ।
उन्मन हरि हें जीवन ह्रदयीं आलें ॥१॥
स्थिरावलें ध्यान ज्ञानाचीये वृत्ति ।
विज्ञानसंपत्ति साधलिया ॥२॥
अंधकारपट नासला समतेज ।
रामरुपी पैज दीपज्ञान ॥३॥
संत शांतशांति उलथिचा ठसा ।
कृष्णरुपीं दिशा तेजो तेज ॥४॥
अलक्ष लक्षिते अगोचर पर ।
तेथेंही गव्हर संचलें ॥५॥
ज्ञानदेव सुखी जालीसे विश्रांति ।
परमानंद चित्तीं निरंतर ॥६॥

अर्थ:-

निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा तूं मूळचा ज्ञानरूप असून तुझ्या मनाची स्थिती उन्मन होऊन गेली आहे. कारण सर्व जीवांचे जीवन जो श्रीहरी तो तुझ्या हृदयांत प्रगट आहे.ही ज्ञानसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञान ध्यानाच्या वृत्ति आपोआपच स्थिर झाल्या. रामकृष्णरूपी परमात्म्याचे ठिकाणी ज्ञानदीप प्रदीप्त झाल्यामुळे प्रपंचरूप अंधकाराचा सर्व पट नष्ट झाला.त्याचप्रमाणे शांत्यादिकाची स्थिती झाली.कारण कृष्णरूपाचे तेजाने सर्वदिशा प्रकाशित झाल्या.वस्तुतः अगोचर अलक्ष असे जे परमात्मतत्त्व त्याचठिकाणी हे रामकृष्ण रूपही गुप्तरूपाने राहिले आहे. मला परमानंद प्राप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला विश्रांती मिळाली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


आधींच तू ज्ञान वरी जालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६०७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *