आदि मध्य अंत सर्वसम हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६५९

आदि मध्य अंत सर्वसम हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६५९


आदि मध्य अंत सर्वसम हरि ।
घटमठचारी भरला दिसे ॥१॥
देखिलागे माये अलक्ष लक्षीतां ।
शांति पक्षवाता समबुध्दि ॥२॥
भावबळें धन अलोट अभंग ।
चित्संगें भंग प्रपंचाचा ॥३॥
ज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम ।
तेथेंचि विश्राम हरिचा असे ॥४॥

अर्थ:-
जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हरिस्वरूपात असल्यामुळे घटमठादि सर्व पदार्थामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे. असे त्या अलक्ष परमात्म्याचे लक्षणाने चिंतन करित असता त्याला मी पाहिला. जसा वायु सर्वत्र व्याप्त असतो. त्याप्रमाणे बुध्दीतील संसाराची बाजु जाऊन शांति प्राप्त झाली. तो अविनाश ज्ञानस्वरूप आत्मा त्याचे ठिकाणी माझा बळकट भाव असल्यामुळे त्याचे संगतीने प्रपंचाचा नाश झाला. नामाविषयी ज्याचे अंतःकरणात नित्य प्रेम आहे. ते अंतःकरणच श्रीहरिच्या विश्रांतीची जागा आहे. त्या अंतःकरणात नित्य श्रीहरि प्रगट असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


आदि मध्य अंत सर्वसम हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६५९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.