संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६६१

निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६६१


निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला ।
दाइजपणें मुकला साभिलाषे ॥१॥
निरंजनवनीं धरीन मुरारी ।
भाग अभ्यंतरीं घेईन देखा ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सोविळा ।
भाग मज आला हरिहरु ॥३॥

अर्थ:-
निर्गुण परमात्मस्वरूपाच्या हाती सर्व जगत व्यवहार अध्यस्त असल्यामुळे जीवाचे आणि त्याचे एकपणाचे नाते मूळचेच आहे. परंत देहादिकांशी तादात्म्य पावल्यामुळे दीनपणा आला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो त्याचा दाईज म्हणजे त्यापैकीच आहे. त्या परमात्मस्वरूपाचा अभिलाष धरल्यामुळे त्याच्या प्राप्तीने आप्तेष्टपणाचा तो पृथक संबंध गेला.असा निरंजन वनांत सगुणरूपाने वास करणारा जो मुरारी त्याला धरून त्याचा भाग मनांत आणील. माझे पिता व रखुमादेवीचे पती, जो हरिहरात्मक सोवळा श्रीविठ्ठल तो माझ्या भागाला आला असे माऊली सांगतात.


निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६६१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *