संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६८०

मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६८०


मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती ।
ते अवघीच प्राप्ति ज्योतिरुपें ॥१॥
तेथें ब्रह्मगर्भा आलें ब्रह्मगर्भा आलें ।
लयलक्ष उरलें बाईयावो ॥२॥
रखुमादेविवरु अप्रमेय देखिला ।
तोही इच्छितां हारपला माझ्या ठायीं ॥३॥

अर्थ:-
मनाची वात करून ज्योत लावायला गेले. म्हणजे परमात्मस्वरूपाचा विचार करावयाला गेले. तो ज्ञानरूप जो परमात्मा त्याचीच प्राप्ती झाली. त्या मनाच्या गर्भात ब्रह्म प्रादुर्भूत झाले. यामुळे लयाचे लक्ष जे ब्रह्म तेवढेच उरले. अप्रमेय म्हणजे अविषय जे रखुमादेविचे पती श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिले. शेवटी त्याची इच्छा करायला गेले तो ते ही माझ्या ठिकाणी हरपून गेले. असे माऊली सांगतात.


मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६८०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *