संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

समाधी हरीची समसुखेंवीण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४९

समाधी हरीची समसुखेंवीण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४९


समाधी हरीची समसुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुध्दी ॥१॥
बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एक्या केशीराजें सकळ सिध्दि ॥२॥
ऋध्दि सिध्दि निधी अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

अर्थ:-

बुध्दीतील द्वैत गेले की समाधीचे सम व शाश्वत सुख भोगता येते.त्यामुळे जीवाला बुध्दी हे सर्वात मोठे वरदान लाभले आहे व त्या बुध्दीद्वारे तो केशीराज आपलासा करता येतो. ऋध्दी सिध्दी मिळवणे म्हणजे उपाधी मिळवण्यासारखे आहे जो पर्यंत त्या परमानंदात मन रमत नाही तो पर्यंत त्याही काही कामाचा उरत नाहीत. त्या हरिचे चिंतन मी सतत करत असल्याने मला रम्य समाधान लाभले असे माऊली सांगतात.


समाधी हरीची समसुखेंवीण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *