संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७


कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज ।
पाहातां वेणु वेदध्वनि नाद उमटताती सहजगे बाई ये ॥१॥
आनंदे गोपाळ गोधनें राखसी तळे यमुनेच्या पाबळीं ।
कर्मकाठी करीं घेउनियां वळत्या देतुसे पांचचा मेळिगे बाइये ॥ध्रु०॥
ऐसा जिकडे तिकडे उभारुनि बाहो ।
हाणतो थोरें निकोपें तयाचिया कर्मा होतिसे निवृत्ति ।
काय पुर्विल येवढें तपगे बाइये ॥२॥
गोवळेपणाचेनि वेषें अमरीं सेविजे बोलताति सवंगडे ।
येरुनि येराचिया उच्छिष्ठा झोंबती नेणो
तया काय जोडेगे बाइये ॥३॥
मुनिजनां स्तवितां संतोष
न पवे तो हुमलि घेतां हांसे ।
ब्रह्मादिकां बोलाचीं अक्षरें कोण
जाणे प्रेम कैसेंगे बाइये ॥४॥
ऐसा साहिदर्शनां वर्णितां पवाडु नाहीं
आणि गोवळेपणें वेष नवल सांगो मी कायी ।
बापरखुमादेविवर विठ्ठल सेविलिया ।
वांचूनि नेणवे केलिया कांहीगे बाइये ॥५॥

अर्थ:-
कल्पवृक्ष तळी तेजःपुंज सुनीळ कृष्णरूप कसे बसले आहे ते पहा. हे जीवरुप सखे त्यानी वाजवलेल्या वेणूतून वेद ध्वनींचे नाद उमटतात असे मला वाटते. युमनातिरी ते गोपाळ आनंदाने ती गोधने राखत आहेत.इंद्रिय रुप गाईना कर्माची काठी लाऊन तो पंचकांच्या ठिकाणी त्यांचा मेळ करतो. बाहे उभी करुन इकडे तिकडे तो कृष्ण जीवरुप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत अ़सुन त्यांच्या पुर्व कर्मांची निवृती करित आहे तसे व्हायला त्यांचे काय पुर्वजन्मीचे तप पुरणार आहे? स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्याचे उष्टे खायला मिळावे म्हणुन तिकडे गोकुळात आले आहेत परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही.मुनिजनांनी केलेल स्तवनाने तो संतोष पावत नाही उलट संवगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरी मुळे तो आनंदात हसतो. ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही. असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र धजावत नाहीत. तो गोवळ्या वेशातील कृष्ण त्याचे नवल मी काय सांगु. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे सेवा केल्याशिवाय इतर सांधनानी जाणता येत नाही असे माऊली सांगतात.


कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *