संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

व्यर्थ प्रपंच टवाळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९०१

व्यर्थ प्रपंच टवाळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९०१


व्यर्थ प्रपंच टवाळ ।
सार एक निर्मळ कृपा करी हरि कृपाळ ।
दीन दयाळ हरी माझा ॥१॥
क्षमा शांति दया रुपी ।
तोचि तरेल स्वरुपीं ।
नामें तरलें महापापी ।
ऐसा ब्रह्मा बोलिला ॥२॥
गीतेमाजी अर्जुनाशीं हरी सांगे साक्षी जैशी ।
जो रत होतसे हरिभक्ताशी ।
तो नेमेशी तरेल ॥३॥
ज्ञानदेव भाष्यें केले ।
गीता ज्ञान विस्तारलें ।
भक्ति भाग्यवंती घेतलें ।
भाष्येंकरुनी गीतेच्या ॥४॥

अर्थ:-

सर्व संसार निष्फळ व मिथ्या आहे. परंतु भगवंताचे नाम हे सर्वांचे सार असून पवित्र आहे. ते नामस्मरण करणाऱ्या नामधारकावर कृपाळु श्रीहरि कृपा करतो. ज्याच्या ठिकाणी शांती क्षमा दया आहेत अशा उत्तम मुमुक्षुला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. परंतु नामस्मरणाने मात्र अजामेळा सारखा महापापी जरी असला तरी तो उद्धरून जातो. असे ब्रह्मदेवांनी सांगीतले आहे. तसेच भगवंताने भगवद्गीतेमध्येही अर्जुनाला म्हंटले आहे. जो मज होय अनन्य शरण । तयाचे निवारी मी जन्ममरण, अशी साक्ष दिल्याप्रमाणे आहे. जो मला अनन्यभावाने शरण येतो तो कितीही महापापी असला तरी मी त्याचा नामस्मरणामुळे उद्धार करतो. मी गीतेवर मराठीत भाष्य केले म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’लिहीली अर्थात ‘भावार्थ दीपीका’ लिहीली त्यामुळे या ज्ञानाचा विस्तार झाला या ज्ञानाचा लाभ जे भाग्यवान भक्त आहेत त्यांनी घेतला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


व्यर्थ प्रपंच टवाळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९०१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *