संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सकळ संप्रदाय श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९१८

सकळ संप्रदाय श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९१८


सकळ संप्रदाय श्रीहरि ।
जो बैसोनि जप करी ।
जिव्हे महादेवाचे अंतरी ।
सर्वकाळ वसतसे ॥ रामनामें जप करी ।
तोचि तरे भवसागरीं ।
पितरांसहित निर्धारी ।
वैकुंठपुरीं पावले ॥ नित्य सत्य समाधान ।
निर्मळ करावें मन ।
नित्य तयासीे नारायण ।
वैकुंठवास करील ॥ बापरखुमादेविवर सिद्धि ।
तरुणोपाय हेचि बुद्धि ।
कृपा करील कृपानिधी ।
ऐसिया भक्तांशी जाणावें ॥

अर्थ:-

महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो. जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.


सकळ संप्रदाय श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९१८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *