संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८०

मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८०


मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति ।
तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥
विरक्तीविषयीं होतांचि विचार ।
नित्य हे नैश्वर ओळखती ॥२॥
तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय ।
अविद्यत्व जाय जीवरुप ॥३॥
शांति क्षमा दया तिष्ठती सहज ।
न दिसे दृश्य काज जगामाजीं ॥४॥
गुरुकृपा द्वारें लहिजे पैं सिद्धी ।
बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ॥५॥

अर्थ:-

मुक्ति प्राप्त करुन घेण्याची इच्छा असेल तर परमेश्वराची भक्ति करा. त्यापासून वैराग्य उत्पन्न होईल. एकदा विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे परमात्माच एक सत्य आहे. व इतर वस्तु अनित्य आहे असा जीवांचा निश्चय होईल. व असा निश्चय झाला म्हणजे जीवरुपाने असलेली अविद्या जाऊन शुद्ध आत्मस्वरुपाचा अनुभव येतो. ज्यांना आत्मज्ञान झाले अशा पुरुषांच्या ठिकाणी शांती, दया, क्षमा वगैरे गुण सहजच दिसतील. व त्यांना जगांत कर्तव्य कांही राहातच नाही. हे आत्मज्ञान गुरुकृपेने प्राप्त होणारे आहे असे निश्चित समजा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *