संत निवृत्तीनाथ अभंग

मारुनि कल्पना निवडिलें – संत निवृत्तीनाथ अभंग

मारुनि कल्पना निवडिलें – संत निवृत्तीनाथ अभंग


मारुनि कल्पना निवडिलें सार ।
टाकीलें असार फलकट ॥ १ ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व ।
विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥
पहाते दुभतें कासवी भरितें ।
नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार ।
सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥

अर्थ: मी कल्पनेचा त्याग केला व आत्मस्वरुपाचे सार स्विकारल्यामुळे मला फलकट संसार टाकता आला. नाम मंत्र जीवी धरल्यामुळे त्या व्यापक परमात्म्याला नामभक्तीने मनात गोवले त्यामुळे इंद्रियांना विषय उरला नाही मग विषय मला टाकता आले. जशी कासवी नेत्रातुन पान्हा देऊन पिलांचे पोषण करते तसे माझे पोषण गुरु करतात. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी केलेले नामामृत तुशारांच्या वर्षावा मुळे माझा विचारच हरिरुप झाला बुध्दीला हरि वाचुन काही दिसत नाही.


मारुनि कल्पना निवडिलें – संत निवृत्तीनाथ अभंग

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड रा

play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *